Press | उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर; प्रवेशिका पाठविण्यासाठी 15 मार्चपर्यंत मुदत
मुंबई | १४.२ | नगरीनगरी (Press) राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकार, लेखक, छायाचित्रकार व समाजमाध्यम प्रतिनिधींसाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार…
(Press) राज्याच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत पत्रकार, लेखक, छायाचित्रकार व समाजमाध्यम प्रतिनिधींसाठी उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाजमाध्यम तसेच स्वच्छता अभियानाविषयी जनजागृतीपर लेखनासाठी हे पुरस्कार दिले जाणार आहेत.
(Press) या स्पर्धेसाठी १ जानेवारी २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन, छायाचित्रे व वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम तारीख १५ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे.
(Press) राज्यातील विविध जिल्ह्यातील इच्छुक स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करून घ्यावेत. तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील स्पर्धकांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-३२ येथून अर्ज मिळवावेत.
स्पर्धेचे अर्ज नमुने व सविस्तर माहिती https://dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे महासंचालनालयाने कळविले आहे.
नगरी नगरी हा आकाशवाणी अहिल्यानगर केंद्रावर प्रचंड लोकप्रिय झालेला कार्यक्रम . त्यातून प्रेरणा घेऊन nagari nagari.com या द्वारे Digital Journalisam क्षेत्रात हे पहिलं पाऊल टाकलं आहे.
अहिल्यानगर। १७.०२। अमोल भांबरकर : (निवड) अहिल्यानगर महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संघटनेच्या नुकत्याच झालेल्या सहविचार सभेत ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बोडखे…