अहिल्यानगर । फोटोवृत्त – विजय मते । नगरी नगरी :
अहिल्यानगर परिसरात गेल्या आठ दिवसांपासून तापमानात सातत्याने वाढ होत असताना, कापूरवाडी तलावातील शिल्लक पाणीसाठा परिसरातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरत आहे. सध्या तलावात अंदाजे ३० ते ४० टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याने उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये शेती आणि जनावरांसाठी या तलावाचा मोठा आधार मिळत आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कापूरवाडी तलावाने शेतकऱ्यांना आशेचा किरण दिला आहे.